संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पतंग महोत्सव उत्साहात संपन्न
संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पतंग महोत्सव उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२६–
कोपरगाव तालुक्याच्या जवळ असणाऱ्या येवला तालुक्यात दरवर्षी पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने आपल्या कोपरगाव शहरात युवकांना आवडेल असा भव्य कोपरगाव पतंग महोत्सव हा नाविन्यपूर्ण उपक्रम कोपरगाव नगरपालिका व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्यमाने युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून यावर्षी सुरु झाला आहे. नुकताच केबीपी शाळेच्या मैदानात हा महोत्सव पार पडला.यास कोपरगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.भव्य पतंग महोत्सवांमधून जनजागृती करण्याचे ध्येय ठेवले असून मकर संक्रातीच्या निमित्त आपल्या शहरांमध्ये तसेच आसपास सगळीकडेच मांजाच्या वापरामुळे विविध वाईट घटना घडत असतात पशुपक्षी तसेच मानवाच्या जीवाला मांजाच्या वापरामुळे धोका निर्माण होतो.त्यामुळे या पतंग महोत्सवात मांजाचा वापर न करण्याचा संदेश दिला जात असल्याचे प्रतिपादन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांनी केले.जाहिरात
कोपरगाव नगरपालिका तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरात प्रथमच भव्य-दिव्य असा पतंग उत्सव संपन्न झाला.यापूर्वी दहीहंडी महोत्सव देखील युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला होता.यावेळी त्या कोपरगाव शहरातील व तालुक्यातील समस्त नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना बोलत होत्या. यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान तसेच सर्व नगरसेवक व कोपरगाव शहरातील पतंग प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रेणुका ताई कोल्हे तसेच नगराध्यक्ष परागसंधान यांनी सर्व नागरिकांसमवेत पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद घेतला.जाहिरात
त्या पुढे म्हणाल्या,संक्रांतीत फक्त पतंग उडवणे हा केवळ एक उत्सवच नाही तर यामागे खूप काही शिकण्यासारखं देखील आहे.पतंग अशी शिकवण देतो की ‘जर वारा विरुद्ध असेल तरच पतंग उंच उडू शकतो’.त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात संकट अडचणी जर आली तर त्यातून आपण मात करून आयुष्यात खूप मोठे होऊ शकतो. पतंगाला जर उंच उडायचं असेल तर त्याची दोर मजबूत लागते.या पतंग महोत्सवात पतंग उडवताना साध्या दोऱ्याचा वापर करून पतंग उडवून या सणाचा तेवढाच आनंद घेऊ शकता असे त्यांनी नमूद केले.पतंगाप्रमाणे आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्या आयुष्यातील मूल्य घट्ट पाहिजे. यामुळे आयुष्यात आपण भरपूर काही मिळवू शकतो.आपण आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे.कुठलंही काम करताना प्रामाणिकपणे करावे.कारण प्रामाणिकपणाचे फळ चांगलेच मिळते.आयुष्यात मनावर ताबा व संयम ठेवता आला पाहिजे.असे त्या म्हणाल्या यावेळी त्यांनी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील समस्त नागरिकांना कोल्हे परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.जाहिरात
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान बोलताना म्हणाले की, संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच कोपरगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरामध्ये प्रथमच भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा पतंग महोत्सव संपन्न होत आहे.युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कायमच सांस्कृतिक धार्मिक तसेच क्रीडा आदी सर्व बाबींना प्रोत्साहन दिलेले आहे. गोदावरी काठी आरती महोत्सव तसेच दहीहंडी उत्सव सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल या सर्व सामाजिक कार्यांच्या माध्यमातून यावर्षी आम्ही प्रथमच कोपरगाव येथे भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले.शहरातील प्रत्येक कुटुंबाला या पतंग महोत्सवाचा आनंद घेण्यात यावा हा आमचा उद्देश्य आहे. यासाठी सार्वजनिक पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला कोपरगावच्या समस्त नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बद्दल समस्त कोपरगावकरांचे आभार मानतो पुढील वर्षी यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.आमच्या पतंगाने 2025 मध्ये कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत जी भरारी घेतली आहे.अगदी त्याच पद्धतीने कोपरगाव शहराच्या तसेच तालुक्याच्या विकासाची नेहमीच उंच भरारी राहणार असून,कोपरगावच्या विकासाचा पतंग असाच उंच उडत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करत. नागरिकांना मकर संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
पतंगाणी भरलेले आभाळ,अवकाशाच्या दिशेने झेपावणारे रंगबेरंगी फुगे, आतिषबाजी आणि गाण्याच्या तालावर पंतंगबाजीचा आनंद घेणारे लहान थोर यामुळे अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण बघायला मिळाले असल्याने कोपरगावकरांनी विवकेभैय्या कोल्हे यांचे विशेष कौतुक केले आहे.