एस एस जी एम कॉलेज

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेतील बहुभाषिक दृष्टिकोन विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेतील बहुभाषिक दृष्टिकोन विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेतील बहुभाषिक दृष्टिकोन विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २५ फेब्रुवारी २०२५रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि मराठी. हिंदी. इंग्लिश विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘multilinguistic approach in Indian knowledge system’ या महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. या परिषदेमध्ये भारतीय ज्ञान परंपरेच्या समृद्ध इतिहासाबाबत वर्तमान स्थितीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विविध देशांतील, राज्यांतील ,तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी सदर परिषदेमध्ये सहभाग घेतला.

जाहिरात

आंतरराष्ट्रीय ई- परिषदेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड.भगीरथ शिंदे यांनी ए. आय. तंत्रज्ञानाद्वारे या महाविद्यालयातून लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते लोकल अशा पद्धतीने ज्ञानाचा प्रसार केला जातो असे सांगून शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे  यांनी, आंतरराष्ट्रीय ई- परिषद घेण्याचा उद्देश स्पष्ट करताना .आजच्या जागतिक परिस्थितीवर आपण अनेक भाषा संवर्धनासाठी विचारपूर्वक ठोस पावले उचलण्यासाठीही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करत आहोत. भारतीय आधुनिक वैज्ञानिक प्रगतीसह भारतीय ज्ञान प्रणालीला मुख्य प्रवाह शिक्षणामध्ये समाविष्ट करणाऱ्या धोरणात्मक उपक्रमांना समर्थन देणे तसेच जनतेच्या शिक्षण व ज्ञानप्रसारासाठी रयत शिक्षण संस्था वचनबद्ध आहे.असे प्रतिपादित केले.

जाहिरात

सदर परिषदेत या परिषदेत डॉ. बीदन आबा, (माजी मराठी विभाग प्रमुख, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट युनिवर्सिटीऑफ मॉरीशस), यांनी समग्र संत साहित्याचा मागोवा घेत संतांचे विचार आजच्या काळात समाज उपयोगी असल्याचे सांगितले. प्रा डॉ.हर्षबाला शर्मा (उप-प्राचार्या इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालय दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली ) यांनी गृरुशिष्य प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीवर भाष्य केले. डॉ.गोविंद गोदावर्थी(Department of English, MANUU, हैद्राबाद) यांनी भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहे असे सांगितले.
द्वितीय सत्रासाठी सारडा कॉलेजच्या मा. प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावितयांनी अध्यक्षपद भूषविले या सत्रामध्ये २० अभ्यासकांनी आपले संशोधन पर लेख सादर केले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी लाभलेले रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी, मराठी भाषा साहित्यातील ज्ञान परंपरा स्पष्ट करताना संत साहित्यातील संत ज्ञानेश्वरांपासून संत बहिणाबाईपर्यंत च्या साहित्याचा मागोवा घेतला. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी संस्कृतभाषेतील साहित्यापासून अलीकडच्या मराठी साहित्यातील विविध साहित्यिकांचा मागोवा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने संस्कृत साहित्यिक भामह, दंडी, भरतमुनी, भर्तुहरी, बाण आदी साहित्यिकांच्या साहित्याचा विशेष उल्लेख करून भारतीय ज्ञान परंपरा समृद्ध आहे हे स्पष्ट केले.

जाहिरात

परिषदेतील पाहुण्यांचा परिचयावकला विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. परिषद यशस्वितेसाठी डॉ.माधव यशवंत, प्रा.डॉ.रंजना वर्दे  व डॉ.बाबासाहेब शेंडगे यांचे सहकार्य लाभले.सदर परिषदेसाठी मराठी हिंदी व इंग्लिश विभागातील प्राध्यापक कठोर परिश्रम घेतले . सदर परिषदेसाठी, डॉ. मोहन सांगळे, डॉ. अर्जुन भागवत, IQAC प्रमुख डॉ. निलेश मालपुरे उपस्थित होते. आभार प्रा.डॉ. भागवत देवकाते यांनी मानले. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. माधव यशवंत यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे