आपला जिल्हा
राज्यातील शेतकरी बांधवांना शक्ती दे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची देवीचरणी प्रार्थना
राज्यातील शेतकरी बांधवांना शक्ती दे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची देवीचरणी प्रार्थना

संगमनेर विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५– शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला असून अशा संकट काळामध्ये त्याला शक्ती दे व सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद समाधान निर्माण होऊ दे अशी प्रार्थना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.









