एक राखी वृक्षा साठी उपक्रम राबवत धोत्रे गावात अनोखे रक्षाबंधन साजरे
एक राखी वृक्षा साठी उपक्रम राबवत धोत्रे गावात अनोखे रक्षाबंधन साजरे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १० ऑगस्ट २०२५– कोपरगाव तालुक्यातील श्री वीरभद्र विद्यालय धोत्रे येथे भारतीय संस्कृतीतील पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यात मेहंदी रेखाटन स्पर्धा, वृक्षाबंधन आणि रक्षाबंधन असा तिहेरी संयोग साधण्यात आला होता.विद्यालयात नेहमी सर्वच उपक्रम आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरे करण्यात येतात.ज्याप्रमाणे बहीण आपल्या भावाला राखी बांधून औक्षण करून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाला देते, आणि आपल्या भावाच्या उत्कर्षाची आवर्जून करुणा भाकते,त्याच प्रमाणे सर्व शिक्षकांच्या संकल्पनेतून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि फक्त झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश न देता ,आपल्या भावाप्रमाणेच त्यांची पण निगा राखणे, काळजी घेणे आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये जागरूकता आणि वृक्षाप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी वृक्ष संवर्धन म्हणून हस्तनिर्मित सुंदर अशा राख्या बनवून झाडांना बांधण्यात आल्या.
जाहिरात
त्यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि इतर पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांना सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले. विद्यालयात नवीन उपक्रम ‘वृक्षाबंधन राबवून एक राखी वृक्षा साठी असा नारा देण्यात आला.त्याचवेळी वृक्षांवर आधारित आरती गात औक्षण करणेत आले.वृक्ष संगोपन जबाबदारी ची प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील मुलींनी मुलांना राखी बांधून सन साजरा करण्यात आला.त्यामधे विशेष बाब म्हणजे मुलींनी राखी स्वतः तयार करण्यात आली,मेहंदी स्पर्धा आयोजन केले.जाहिरात
या उपक्रमासाठी धोत्रे गावातील प्रथम नागरिक प्रदीप चव्हाण सरपंच,ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे ,उपसरपंच गागरे पाटील,अनिल दवंगे, संतोष माळवदे, सागर शिंदे, संजय जानराव, नितीन रोकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सणाचे महत्व आपल्या विचारातून व्यक्त केले.यासाठी श्री वीरभद्र विद्यालय धोत्रे विद्यालयातील मुख्याध्यापक पाटील सर, शरद गागरे सर, राजेंद्र देशमुख , गिरीश केणे, अर्जुन सुरपल्ली, दादासाहेब हरकळ, थोरात मॅडम , कैलास सातपुते, सुभाष चन्ने, बळीराम रोकडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.