टाकळीत ढगफुटी जन्य पावसाने संपूर्ण गाव जलमय
टाकळीत ढगफुटी जन्य पावसाने संपूर्ण गाव जलमय
टाकळी येथे ढगफुटी जन्य पावसाने संपूर्ण गाव जलमय

कोपरगाव विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात काल बुधवार सकाळी अत्यंत जोराचा झालेल्या पावसाने आणि नंतर सायंकाळी ते पहाट पर्यंत ढगफुटी जन्य पावसाने पाणीच पाणी करत संपूर्ण परिसर जलमय झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

या पावसाने शेतातील सोयाबीन पीक दोन ते तीन दिवसांवरच काढण्यात आलेले असल्याने संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाताची निघून गेलेले आहेत पाण्याला इतका स्पीड होता की ऊस देखील मुळापासून बाजूला झालेल्या तरी शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.

या प्रसंगी मा सभापती सुनिल देवकर, सरपंच संदिप देवकर, उप सरपंच संजय देवकर,सदस्य शशिकांत देवकर, पोलिस पाटील राजेंद्र देवकर,शिवसेना गण प्रमुख रविंद्र देवकर, गट प्रमुख महेंद्र देवकर, शेतकरी मच्छिंद्र देवकर, सोपानराव देवकर, अनिल देवकर, सतिष देवकर, गोरख देवकर, राजेंद्र देवकर, बद्रीनाथ शेलार, भाऊसाहेब देवकर, अरुण मालकर, अनिल मालकर, सचिन शेलार, गणेश नन्नवरे आदि परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी अतिशय चिंता व्यक्त केली






