आपला जिल्हा

रयतच्या शिक्षकांनी काळानुसार अपडेट रहावे – आमदार आशुतोष काळे

रयतच्या शिक्षकांनी काळानुसार अपडेट रहावे – आमदार आशुतोष काळे

रयतच्या शिक्षकांनी काळानुसार अपडेट रहावे – आमदार आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ डिसेंबर २०२५ – “रयत शिक्षण संस्था समाजाचा आरसा होत आहे त्यामुळे संस्थेने तयार करून दिलेले निकष आणि समाजाच्या गरजा ओळखून  रयतच्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवावेत”. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. ते श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे आयोजित मुख्याध्यापक व लेखनिक प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते.

जाहिरात

कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख अतिथी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन मा.ॲड.श्री. भगीरथ शिंदे यांनी अतिथीय भाषणामध्ये कार्यशाळेतील उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना, “शिक्षणक्षेत्रामध्ये पारदर्शकता येणे आवश्यक असून त्यासाठी TALLY सारखे software आवश्यक आहे. आज  गुरुकुल प्रकल्पाच्या उदाहरणातून कार्यालयीन पारदर्शकता सिद्ध होत असल्याचे दिसून येते. कार्यालयीन पारदर्शकता आणण्यासाठी मुख्याध्यापक व लेखनिक प्रशिक्षण कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होऊन या कार्यशाळेची व्यवस्थापनासाठी मदत होऊ शकते.” असे प्रतिपादन केले.

प्रमुख उपस्थिती लाभलेले रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिट) मा.प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी, “रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्य करत आहे.  यात प्रामुख्याने इंटरऍक्टिव्ह पॅनल,, गुणवत्तावाढ, तंत्रज्ञान विकास यांकडे लक्ष देऊन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हे NEET, JEE, CET यांसारख्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राध्यापकांनी स्टडी मटेरियल मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण केंद्रामध्ये संपूर्ण रयत शिक्षण संस्थेत ५३ हजाराहून अधिक विद्यार्थी ए.आय चे प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.”

जाहिरात

  सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी करत “महाविद्यालयातील विविध भौतिक सुविधांचा परिचय करून देऊन आज महाविद्यालयाची प्रगती,  महाविद्यालयाचे संशोधन विकास धोरण, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा,माजी विद्यार्थी संघ स्थापन केल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले”.  या सदर कार्यशाळेस  नवनाथ बोडके (विभागीय अधिकारी, उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था सातारा), प्रशांत साळुंखे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रयत शिक्षण संस्था, सातारा) संदीप भुजबळ (लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा), राजेंद्र काकुळते (प्रकल्प अधिकारी आश्रम शाळा रयत शिक्षण संस्था सातारा)  पद्माकांत कुदळे (सदस्य, जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था, सातारा) तसेच विविध विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक व लेखनिक असे एकूण १५० कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे  यांनी केले. तर आभार कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  संजय शिंदे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे