उजनी टप्पा क्रमांक एक सुरू,नागरिकांनी मानले सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार
झगडे फाटा ते कोपरगाव संगमनेर तालुकाहद्द रस्ता समस्येचे दिले निवेदन

कोपरगाव विजय कापसे दि ३० जुलै २०२४– कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, अंजनापुर, जवळके, काकडी

झगडे फाटा ते कोपरगाव संगमनेर तालुका हद्दीचा मुख्य रस्ता मातीमोल झाला आहे.दर्जाहीन कामामुळे दहा कोटींचा शासकीय निधी वाया गेला आहे.प्राप्त निधीचा गैरवापर झाला आहे अशी भावना नागरिकांची आहे, त्यामुळेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.काहीच दिवसात रस्ता उखडला असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आमची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सहकार्य करावे व आपल्या सहकार्याने आमचा हा प्रश्न देखील लवकर मार्गी लावावा यासाठी आम्ही आग्रही आहोत.विद्यमान आमदार काळे यांनी ठेकेदार पूरक धोरण घेतल्याने नागरीकांना हाल सोसावे लागत आहे.केवळ आमच्याच भागात नव्हे तर संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात रस्त्यांची चाळण झाली आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांना पावसाळ्यात घसरगुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.आमचा मुख्य रस्ता असताना देखील त्याच्या कामात मोठा अपहार झाल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.या गैरकारभारा विरोधात आपण लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी कोल्हे यांच्याकडे केली आहे.

ज्या प्रमाणे उजनी पाणी प्रश्नात आपण तत्परतेने लक्ष घातले तसेच या मुख्य रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी व सबंधितांकडून झालेल्या निकृष्ट कामाची सुधारणा होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकरी, नागरिक, विद्यार्थी आमचे दळणवळण या मार्गाने अधिक असल्याने ज्यांच्या हाती कारभार होता ते सपशेल फोल ठरल्याचे आता आपणच आमचा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.माझे आपणास नेहमी सहकार्य होते आणि पुढेही राहील असे सौ.कोल्हे म्हणाल्या.

