वारी व हनुमानवाडीत आरपीआय आठवले पक्षाच्या शाखांचे उद्घाटन
वारी व हनुमानवाडीत आरपीआय आठवले पक्षाच्या शाखांचे उद्घाटन
कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑक्टोबर २०२४– आर पी आय आठवले पक्षाचे तालुकाअध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाची कोपरगाव तालुक्यातील वारी तसेच हनुमान वाडी या दोन शाखा फलक अनावरण सोहळा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी राज्यसचिव दिपक गायकवाड , शहराध्यक्ष सोमनाथ लोहकरे , मातंग जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड , श्रीरामपूर शहराध्यक्ष विजय पवार , बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक , रशिद शेख , मुस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू सैय्यद , तालुका उपाध्यक्ष किशोर मैन्द , शहरउपाध्यक्ष अनिस शेख , तालुका उपाध्यक्ष अकील शेख, शहर उपाध्यक्ष अजीत कुशर , शहर उपाध्यक्ष अमोल थोरात , मुस्लिम आघाडी शहरउपाध्यक्ष अस्लम शेख , शुभम भालेराव आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र् थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की गेल्या आठ दिवसापूर्वीच आरपीआय मुस्लिम आघाडीची स्थापना कोपरगाव शहरात तर गेल्या वर्षभरात तेरा ते चौदा शाखेचे उद्घाटन करण्यात आले या वेळी तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे यांचे भरभरून कौतुक केले . तसेच अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो . आपण कुणावर अन्याय करायचा नाही आणि कोणी अन्याय करत असेल तर सहन करायचा नाही तर रिपाई हा सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे तर आपला रिपाई परिवार सदैव अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिल अशे जाहिर आश्वासन दिले .
यावेळी आयोजक म्हणून राजवाडा प्रतिष्ठान , तथागत तरूण मंडळ , पंचशील तरुण मंडळ ,लैब्यक ग्रुप तसेच हनुमान वाडी येथील संघर्ष तरुण मित्रमंडळ यांनी मोलाचे सहकार्य करुन मान्यवरांचे आभार मानले .तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वारी शाखा अध्यक्ष पदी आकाश निळे यांची निवड करण्यात आली तर शाखा उपाध्यक्ष पदी केतन भारूड यांची निवड करण्यात आली तसेच हनुमान वाडी शाखा अध्यक्ष पदी आनंद सुरडकर यांची निवड करण्यात आली तर शाखा उपाध्यक्ष पदी सागर साबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले .