आमदार आशुतोष काळे यांनी पाळला शेतकऱ्यांना दिलेला शब्द; जेऊर कुंभारी गावातील देवकर वस्तीला मिळाले नवीन रोहित्र
आमदार आशुतोष काळे यांनी पाळला शेतकऱ्यांना दिलेला शब्द; जेऊर कुंभारी गावातील देवकर वस्तीला मिळाले नवीन रोहित्र
आमदार आशुतोष काळे यांनी पाळला शेतकऱ्यांना दिलेला शब्द; जेऊर कुंभारी गावातील देवकर वस्तीला मिळाले नवीन रोहित्र

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२५– जेऊर कुंभारी (ता. कोपरगाव) अनेक वर्षांपासून विजेच्या अडचणींना तोंड देणाऱ्या देवकर वस्तीतील शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत सोळके वस्ती येथे नवीन रोहित्र (DP) बसवण्यात आले असून, त्यामुळे देवकर वस्तीवरील विजेचा ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

देवकर वस्तीमध्ये एकाच रोहित्रावर अनेक मोटारी कार्यरत असल्यामुळे विजेचा भार सातत्याने वाढत होता. परिणामी, वारंवार रोहित्र जळणे, दुरुस्तीसाठी दहा-पंधरा दिवस वाया जाणे, अशा प्रकारच्या अडचणींमुळे शेतकरी त्रस्त होते. शेतीच्या हंगामात पिकांना पाणी देता न येणे, हेसुद्धा मोठं संकट ठरत होतं. या समस्येच्या समाधानासाठी गावकरी व आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी आमदार काळे यांची भेट घेतली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार काळे यांनी “नवीन रोहित्र लवकरच उपलब्ध करून दिले जाईल,” अशी हमी दिली होती. त्या आश्वासनाची पूर्तता करत, १५ जून रोजी सोळके वस्ती येथे नवीन डीपी बसवण्यात आली. या उपक्रमामुळे देवकर वस्तीतील विजेचा भार कमी होणार असून शेतकऱ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

या कामाबद्दल आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाचे कार्यकर्ते, रामनाथ आव्हाड, केशव आबनावे पाटिलबा वक्ते, दिलीपराव शिंदे,बापुराव वक्ते,कल्याणराव गुरसळ , धोंडीराम वक्ते, महेंद्र वक्ते, भाऊसाहेब वक्ते, किरण वक्ते, विरू शिंदे,भानुदास वक्ते,राजेंद्र गिरमे,पोपट शिंदे, संजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी रामनाथ आव्हाड,पाटीलबा वक्ते, भानुदास वक्ते यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगिक आशोक राऊत, शामराव वक्ते, लक्ष्मण वक्ते, गोकुळ जावळे, बाळासाहेब देवकर, दादासाहेब चव्हाण,सतिश गोसावी, निराभाऊ जावळे, बाळासाहेब सोळके ,दौलत सोळके, गंगाराम सोळके ,पक्का वक्ते, सुनिल वक्ते, राजेंद्र वक्ते, संजय वक्ते, आप्पासाहेब सोळके, पोपट सोळके, किसन सोळके ,द्वारकानाथ देवकर, बारकु देवकर, दिपक गिरमे, रावसाहेब गोसावी, पाराजी वक्ते, साईराज मेहेत्रे, प्रसाद जगताप आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन बाळासाहेब देवकर यांनी केले व आभार भानुदास वक्ते यांनी मानले.
आमदार आशुतोष काळे यांनी दिलेले आश्वासन पाळत शेतकऱ्यांचा शेतीसंबंधीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. कोपरगाव तालुक्यातील खऱ्या अर्थाने शेतकरी हितैषी आमदार आहेत असे त्यांच्याबद्दल ठामपणे म्हणता येईल.
–बाळासाहेब देवकर
शेतकरी



