संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
नोेकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना यशस्वी उद्योजक सुनिल रायथाथा


प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून चालु शैक्षणिक वर्षात विद्यार्थी व संस्थेने वेगवेगळ्याा क्षेत्रात राज्य व देश पातळीवर गौरवाचे कोणते कीर्तिमान मिळविले हे सांगीतले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगती करीत असुन महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पालीटेक्निकच्या यादीत या पॉलीटेक्निकचा समावेश असल्याचे सांगीतले.
श्री रायथाथा पुढे म्हणाले की जी संसाधने आपल्याकडे आहेत त्यांचा उत्तम उपयोग कसा करता येईल यावर मंथन केले पाहीजे. परमेश्वराने आपणास हात, पाय आणि बुध्दी दिलेली आहे, म्हणुन नाही म्हणायचेच नाही. उद्योग उभारणीसाठी पैसा लागतो, परंतु त्याहीपेक्षा आपल्या उद्योगासंदर्भातील नाविण्यपुर्ण कल्पना महत्वाच्या असतात. पैशापेक्षाही आपल्या कल्पना अधिक मौल्यवान असतात. उद्योगात पुढे जात असताना समस्या येतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर प्रगती खुंटते, म्हणुन समस्यांना आव्हान म्हणुन स्वीकारून त्यांच्यावर मात करा, आणि यशस्वी उद्योजक बना. प्रत्येक उद्योगात अपयश येतेच, परंतु खचुन न जाता पर्याय शोधत रहा.

श्री नायडू म्हणाले की संजीवनी संस्था ग्रामीण भागात असली तरी व्यवस्थापनाच्या दुरदृष्टीमुळे येथे वर्ल्ड क्लास शिक्षण मिळत आहे. यामुळे हमखास स्वावलंबी होणारी पिढी घडत असल्याचे प्रतिपादन त्यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.






