आपला जिल्हा
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिले दोन दिवसाचे वेतन
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिले दोन दिवसाचे वेतन

कोपरगाव विजय कापसे दि १७ ऑक्टोबर २०२५- मागील आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने अशा संकटाच्या काळात शासन मदत करत आहे परंतु आपण देखील या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले २ दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर करत तसे पत्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे १० ऑक्टोबर रोजी दिले असल्याचे संघटनेचे पदाधिकारी तथा कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशासक संदीप दळवी यांनी दिली आहे.






