आपला जिल्हा

दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल

दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल
दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल
जाहिरात

Sangmner vijay kapse दि १२ एप्रिल २०२६-  दुष्काळी भागातील तळेगावसह 16 गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी थेट प्रवरा नदीवरून 16 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू ठेवली. मात्र मागील दीड वर्षापासून ही योजना बंद असल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहे.

तळेगाव,चिंचोली गुरव, तिगाव, काकडवाडी,पारेगाव,नान्नज दुमाला,देवकवठे,वरझडी बुद्रुक, खुर्द यांसह विविध 16 गावांना या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याची संकल्पना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राबवली. सातत्याने शासनाच्या विविध योजनांमधून लाईट बिल भरून ही योजना कार्यान्वित केली. या योजनेवर कारभारासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची स्थानिक कमिटी बनवली. त्या माध्यमातून अत्यंत माफक पाणीपट्टी घेऊन ही योजना अनेक वर्ष सुरू राहिली ज्या ज्या वेळी अडथळे आले त्या त्यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने योजना सुरू करण्यात आली. मागील पंधरा वर्ष विविध गावांमधील नागरिकांना अत्यंत सुरळीतपणे पिण्याचे पाणी मिळत होते. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या देवकवठे गावातील नागरिकांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची हमखास व्यवस्था या योजनेमुळे झाली होती. कोणताही अडथळाला की थेट माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन अडचणी सोडवली जायची.

जाहिरात

मात्र मागील दीड वर्षापासून म्हणजे नोव्हेंबर 2024 पासून तळेगाव पाणीपुरवठा प्रादेशिक योजना पूर्णपणे बंद आहे. यामुळे काकडवाडी चिंचोली गुरव पारेगाव बुद्रुक यामधील गावांना कोणताही पाणीपुरवठा होत नाही नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची हाल होत आहे. नवीन लोकप्रतिनिधीने काही ठिकाणी टँकर हे प्रसिद्धीसाठी पाठवले आणि फोटोसेशन झाल्यानंतर टँकर गायब झाले मात्र महिलांची आणि नागरिकांची पाण्याची वणवण थांबली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला.

यानंतर विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सदर योजना आपण सुरू केली आहे आणि पुन्हा आपण लक्ष घालून सुरू करावी अशी आग्रही मागणी केली आहे. यामध्ये काकडवाडी मधून सरपंच जनार्दन कासार,सुनील कासार,चिंचोली गुरव मधून लोकनियुक्त सरपंच विलास सोनवणे,  विलास मास्तर सोनवणे,योगेश सोनवणे, विजय गोडगे, वाल्मीक गोडगे,संदेश गोडगे, राजेंद्र कहांडळ,राजेंद्र मुंगसे,ज्ञानेश्वर मुंगसे, दौलत गडाख, त्रंबक गडाख, डॉ.दत्तात्रय गडाख, डॉ.संदीप गोरडे यांच्यासह तळेगाव मधील विविध कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे.

जाहिरात

कोल्हेवाडी येथील काही माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाईपलाईनला विरोध

सत्ताधारी महायुतीच्या कोल्हेवाडी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पाईपलाईनला अडचणी निर्माण केले आहेत. नवीन काम सुरू असताना तळेगाव भागाला पाणी न देण्यासाठी विविध अडचणी निर्माण केल्या जात आहे. कोणीही या कामात अडचणी आणू नका अशी आग्रही मागणी तळेगाव भागातील विविध गावांमधील नागरिकांनी केली आहे. 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे