अवकाळी पावसात वीज पडून मृत्यू झालेल्या मायगाव देवी येथील कै. मिराबाई थोरात यांच्या वारसांना ४ लाखांची मदत;
मा.आ.स्नेहलता कोल्हे व आ.विवेक कोल्हे यांनी केला पाठपुरावा
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १० जुलै २०२६-कोपरगाव तालुक्यात दि. १३ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून झालेल्या दुर्घटनेत निधन झालेल्या मायगाव देवी येथील कै.मिराबाई सुरेश थोरात यांच्या वारसदारांना मा.आ.स्नेहलता कोल्हे व आ.विवेक कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
जाहिरात
कोपरगाव तालुक्यात दि. १३ मे २०२६ रोजी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने मोठे थैमान घातले होते. याच दरम्यान मायगाव येथील गृहिणी कै. मिराबाई सुरेश थोरात यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे थोरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.जाहिरात
त्यावेळी संबंधित घटनेची माहिती मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांना मिळताच त्यांनी मायगाव येथे जाऊन कै.मीराबाई थोरात यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.त्यानंतर मा.आ.स्नेहलताताई कोल्हे व आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महसूल प्रशासनाने आवश्यक पंचनामा, कागदपत्रांची पूर्तता व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.नुकतीच शासनाने संबंधित प्रस्तावास मंजुरी दिली असून कै.मिराबाई सुरेश थोरात यांच्या वारसदार पती सुरेश थोरात यांना ४ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.जाहिरात
मतदारसंघात कोल्हे परिवार कायम नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या वेदना जाणून आहे. संकटांची झळ बसलेल्या कुटुंबांच्या दुःखात नेहमीच सहभागी राहिला आहे.नैसर्गिक आपत्तीत कुणाच्याही कुटुंबातील व्यक्ती गमावण्याचे दुःख कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघू शकत नाही.शासनाकडून जाहीर झालेल्या या मदतीमुळे दिवंगत व्यक्ती परत येणार नसली,तरी या कठीण प्रसंगी कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळावा,हीच शासनाच्या मदतीमागील भावना आहे – मा.आ.स्नेहलता कोल्हे