संगमनेर
तीन महिन्यापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद; १६ गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल
तीन महिन्यापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद; १६ गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल

संगमनेर विजय कापसे दि २ मार्च २०२५– लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रवरेचे पाणी देवकवठेच्या टोकापर्यंत पोहोचवताना सोळा गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजने मधून सातत्याने पाणी दिले. अनेक वेळा अडचणी आल्या त्यावर मात करून हे पाणी मिळत राहिले. मात्र मागील तीन महिन्यांपासून कोणत्याही गावांमध्ये पाणी योजनेचे पाणी मिळत नसल्याने १६ गावांमधील नागरिकांचे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल झाले आहे.




