कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना

कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना
कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना

कोपरगाव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२६– :- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला आहे त्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ झाली असून कोपरगावकरांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.

आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांसमवेत कोपरगाव नगरपरिषद कार्यालयास भेट दिली असता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांचा पाणी साठा कमी झाल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे आ.आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून कोपरगाव शहरासाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या आहेत.

यावेळी पार पडलेल्या बैठकीत कोपरगाव शहराच्या नागरीकांना सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे. कोपरगाव शहराची स्वच्छता व्यवस्थित करावी. शहरातील प्रत्येक प्रभागात समप्रमाणात व उच्च दर्जाचे विकासकामे झाली पाहिजे. ज्या प्रभागात विकासकामे बंद पडले आहेत त्या कामांना तातडीने सुरुवात करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिल्या. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ.गौरी पहाडे, सौ.माधवी वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सौ.निर्मला आढाव,सौ.स्मिता साबळे,इम्तियाज अत्तार,वाल्मिक लाहीरे, राहुल शिरसाठ,सौ.सोनम त्रिभुवन,सौ.सोनाली कपिले, फकीरमामू कुरेशी, रमेश गवळी,आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.




