आपला जिल्हा
हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते- रेणुका कोल्हे

शिंगणापूर येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२६– विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिरद्वारे समाज हितासाठी शिक्षण संस्था, युवा संघटना आणि प्रशासन एकत्र येऊन काम करत असल्याचे हर सुंदर चित्र पाहून मन भरुन आले आणि अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते आणि सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात असे प्रतिपादन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील शिंगणापूर गावात संजीवनी विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना मुख्यमंत्री समुद्र पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार व आरोग्य शिबिर प्रसंगी बोलताना व्यक्त केले.















