स्वर्गीय आ.शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण शहाणपण असलेले नेतृत्व – बाळासाहेब थोरात
स्वर्गीय आ.शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण शहाणपण असलेले नेतृत्व – बाळासाहेब थोरात

संगमनेर विजय कापसे दि १७ ऑक्टोबर २०२५- आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्ष विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. जनसामान्यांची भावना जाणणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले लोक नेतृत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.


आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःचा एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी आहे.
पैलवान व्यक्तिमत्व असलेले आणि सतत हसतमुख आणि सकारात्मक विचारांचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच ते मंत्री असा राजकीय प्रवास केला. माझ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात त्यांची रणनीती, विचारांची खोली आणि संघटन शक्ती अनुभवण्याचा मला योग आला. कायम लोकांमध्ये राहणारे,थेट बोलणारे,कृतिशील व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.

संघर्षशील नेतृत्व हरपले – मा.आमदार डॉ.सुधीर तांबे




