आपला जिल्हा
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात ११०० वटवृक्षांचे रोपण; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात ११०० वटवृक्षांचे रोपण; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम

Sangmner vijay kapse दि २९ जुन २०२६–लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे असे आवाहन मा. नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर निरोगी जीवन व ग्लोबल वार्मिंग च्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्ष संगोपन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.











