गोदावरी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे सहाय्यक गट विकास अधिकारी दळवी
गोदावरी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे सहाय्यक गट विकास अधिकारी दळवी
Kopargaon vijay kapse दि ८ जुलै २०२६– कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिक व प्रशासनाने सतर्क राहावे असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या गाव प्रशासनाला दिले आहे.जाहिरात
गेल्या दोन दिवसापासून नाशिक त्रंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातुन धरणातून ५५ हजार ७७८ क्युसिक क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे, तर असाच पाऊस नाशिक परिसरात सुरू राहिला तर या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावांनी काळजी घ्यावी तर या सर्व आपत्कालीन परिस्थितीवर कोपरगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक गावच्या प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेत आहे.गोदावरी मौनगिरी सेतू