शिंगणापूर व संजीवनी परिसरातील सकल आंबेडकर समाजाच्या वतीने गरजू मुलांना शालेय साहित्य व सायकलीचे वाटप
महापुरूषांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज : विवेक कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि २३ एप्रिल २०२४–राष्ट्राला विकसीत करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या बलिदान हे डोक्यावर घेण्यासारखे आहे, मात्र ते डोक्यावर घेऊन डोक्यात घेऊन त्यांच्या विचारातुन कृती आणणे आवश्यक आहे, त्यामुळे विचारापूरते मर्यादित न राहता त्यांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
शिंगणापूर आणि संजीवनी परिसरातील सकल आंबेडकर समाजाच्या वतीने आयोजित कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ (दि.२३) मंगळवार रोजी जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सकल आंबडेकर समाजाच्या वतीने अतिरिक्त खर्चाला फाटा देत गरजू मुलांना शालेय साहित्य व सायकलीचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये सायकल, शालेय साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना झोपण्याचे बेडचे वाटप विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.