थोरात महाविद्यालयात २६ व २७ एप्रिल रोजी साहित्य लेखन कार्यशाळा
थोरात महाविद्यालयात २६ व २७ एप्रिल रोजी साहित्य लेखन कार्यशाळा

या साहित्य लेखन कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता के बी दादा सभागृह येथे जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी एकनाथराव आव्हाड ,बालकुमार साहित्य संमेलनाची माजी अध्यक्ष गोविंदराव गोडबोले,लाडोबा प्रकाशाचे घनश्याम पाटील, उद्योजक डॉ.संजय मालपाणी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

यामध्ये शिक्षकांनी काय आणि कसे लिहावे या विषयावर डॉ.शकुंतला काळे, कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावर गोविंद गोडबोले, प्रत्यक्ष कविता लेखन स्वरूपातील चला कविता लिहूया यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत सिने गीतकार व कवयित्री ज्योती घनश्याम, अभिवाचन कला फुलवा मध्ये नामवंत अभिवाचक व्हाईस ओव्हर आर्टिस्ट रसिका तुळजापूरकर, लेखक दिग्दर्शक अक्षय उपळेकर मार्गदर्शन करणार आहेत याचबरोबर घनश्याम पाटील ही या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत लेखकांच्या गप्पा या सत्रांमध्ये नागेश शेवाळकर प्रशांत केंदळे, डॉ. संतोष खेडलेकर सहभागी होणारा असून पाऊस कवितांच्या या निमंत्र्यांच्या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी शशिकांत शिंदे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

या कार्यशाळेच्या समारोप नामवंत ग्रामीण साहित्यिक प्रा.मा.रा.लामखडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तरी या साहित्य संमेलनाचा जास्तीत जास्त लेखक साहित्यिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे सचिव संदीप वाकचौरे, दत्तात्रय आरोटे, स्मिता गुने, मुकुंद डांगे, शांताराम डोंगरे,तुषार गायकर,अनिल देशपांडे, डॉ.संजय दळवी, प्रा विश्वनाथ भुजबळ, श्री.जोशी व कार्यकारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




