आपला जिल्हा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा – विश्वास पाटील

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा – विश्वास पाटील

जयंती उत्सवानिमित्त गुणगौरव सोहळा संपन्न

Sangmner vijay kapse दि १७ ऑगस्ट २०२६संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची लढाई ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी होती. विविध भाषांमधून त्यांचे साहित्य जगापुढे आले आहे. मानवतावादी नेते असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी महानगरीय साहित्याचा पाया घातला असून त्यांना भारतरत्न द्यावा अशी आग्रही मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

मालपाणी लॉन्स येथे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन मंच यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त गुणगौरव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर, कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले, तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, आयएएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रेरणा खवळे, इंद्रजीत भाऊ थोरात,सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, जगन्नाथ आव्हाड, विश्वनाथ आल्हाट अनुसूचित जाती जमाती विभागाचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, जगन्नाथ आव्हाड, चंद्रकांत चव्हाण, दत्तात्रय अवचिते, गणेश बलसाने,दगडू साळवे, गोरक्ष जगधने, विजय खरात,किरण आल्हाट, सोनू गायकवाड, संकेत आल्हाट,स्वप्नील चव्हाण, अजित आल्हाट, आदित्य आल्हाट आदिमसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मातंग समाजामधून पहिली आईएएस झालेली विद्यार्थिनी प्रेरणा खवळे हिचा सन्मान करण्यात आला.

जाहिरात

यावेळी प्राध्यापक रघुनाथ खरात यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ.भाऊसाहेब पवार, प्रा.तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड, प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना पानिपतकार विश्वास पाटील म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहिल्या सात अग्रणींमध्ये त्यांचे नाव कायम आहे. समानता आणि मानवतावादाचे पुरस्कार दे असलेल्या अण्णाभाऊ साठे यांची फकीरा आणि माकडीचा चाळ या कादंबऱ्या साहित्यिकांसाठी अजिंठा आणि वेरूळ आहेत. त्यांच्या प्रत्येक साहित्यातून तत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.

जाहिरात

विविध भाषांमधून त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायला पाहिजे होते ती खंत राहून गेली असे ते म्हणाले तर प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी प्रवास असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

तर अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर म्हणाले की, अण्णाभाऊंचा विचार हा मानवतेचा विचार आहे.अशा महापुरुषांना एका जातीमध्ये बांधून ठेवणे योग्य नाही. अण्णाभाऊंनी जाती व्यवस्थेला लाथ मारली. महापुरुषांच्या जयंती साजरा केल्या जातात डीजे नाच गाणे होतात परंतु पुढे काय हे लक्षात घेतले पाहिजे. मनुवादी व्यवस्था आपल्यासमोर उभी राहिली आहे मेलो तरी चालेल पण भाजपला मतदान करू नका असे सांगताना संगमनेरच्या विधानसभेचा निकाल हा संविधानाचा पराभव असल्याची खंत व्यक्त करताना भारतीयत्व हेच खरे राष्ट्रीयत्व असल्याचे ते म्हणाले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक उभारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषाकडून प्रेरणा घेताना सॅल्यूट करणारे होण्याऐवजी सॅल्यूट घेणारे व्हावे अशी जिद्द ठेवून अभ्यास करा असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जयंती मध्ये अशा प्रेरणादायी व्याख्यानांमधून तरुणांपुढे आदर्श निर्माण होतो.सध्याचे सरकार कोणाचे ऐकत नसून जंतर – मंतर वरील झेन झी च्या आंदोलनाने विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव निर्माण केली आहे.

तर प्रेरणा खवळे म्हणाल्या की, माझ्या यशामध्ये आई – वडिलांचा मोठा वाटा असून प्रत्येक अडचण काहीतरी नवीन शिकवत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अडचणींना घाबरू नये.

यावेळी डॉ.संतोष खेडलेकर, प्रा.बाबा खरात, शिवाजी कांबळे, दशरथ वर्पे, अमोल शेरकर, योगेश आव्हाड, ॲड.रंजना गवांदे,बंटी यादव,माणिकराव यादव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन निलेश पर्वत यांनी केले तर दत्तात्रय अवचिते यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे