रांजणगाव देशमुख ते झगडे फाटा रस्ता आजुन किती लोकांचा घेणार बळी – बाळासाहेब गव्हाणे
दुरुस्तीकडे संबधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
अपघातात अनेकांचे बळी तर अनेकांना कायमचे अपंगत्व
जाहिरात
कोपरगांव विजय कापसे दि २६ मे २०२५– कोपरगाव – संगमनेर-पुणे या महत्वाच्या शहरांना जोडणारा झगडेफाटा-पोहेगाव ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची खड्यांमुळे अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. या रस्त्यावरचा प्रवास लोकांच्या जीवावर बेतणारा ठरत असून खड्यांमुळे अनेक अपघात दररोज होत आहेत.या रस्ता दुरुस्तीकडे संबधित विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले असुन किती लोकांचे बळी घेतल्यानंतर हा रस्ता संबधित विभाग दुरुस्त करणार आहे असा प्रश्न या रस्त्याने नेहमी ये जा करणा-यांना पडत असून पावसाळ्याच्या आत प्रशासनाने या रस्त्याचे काम पूर्ण नाही केले तर ग्रामस्थांसमवेत मोठे जनआंदोलन उभारू असा इशारा अंजनापूरचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गव्हाणे यांनी दिला आहे.
जाहिरात
सध्या सुरू असलेल्या पावसाने तर या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. या रस्त्याला खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत.वाहने कशी चालवावीत असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे.रस्त्याला अनेक ठिकाणी साईड पट्टे राहिलेले नाही त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्यामधुन वाहनांना मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागत आहे.अनेक ठिकाणी रस्त्याच्या पुलांची एका बाजुच्या भिंती अनेक दिवसापासुन पडुन गेल्या आहे.वाहन कधीही रस्त्यावरुन खड्यात जाऊ शकते.रस्ता नाही तर फक्त खड्डेच खड्डे आहेत या रस्त्यावर.कायम ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत आहे.जाहिरात गौतम
या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णता दुर्लक्ष आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामात लक्ष घालून हा रस्ता दर्जेदार व वाहतुकीयोग्य करावा अशी मागणी वाहनधारकां सह स्थानिकांकडून होत आहे या रस्त्याला नेहमीच मलमपट्टी केली जाते पण कायमचे काम का केले जात नाही ,अजुन किती दिवस मलमपट्टीवर काढायचे असा प्रश्न वाहनधारकांना पडत असून प्रशासनाला हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम हाती घ्या अन्यथा कुठल्या क्षणी ग्रामस्थांसमवेत आक्रमक पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा बाळासाहेब गव्हाणे यांनी दिला आहे.जाहिरातकाही क्षणचित्रे