आपला जिल्हा
चुकीच्या गोष्टींना उत्तर द्यावे लागेल – बाळासाहेब थोरात; काँग्रेसचा विचार हा जनकल्याणाचा शाश्वत विचार

संगमनेर विजय कापसे दि ५ जुलै २०२५– संतांचा समतेचा विचार हा राज्यघटनेमध्ये आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी आहे. तालुक्यामध्ये काही लोक दांडगाई करू पाहत आहे. अशा लोकांना वेळीच रोखले पाहिजे. हा तालुका सुसंस्कृत विचारांचा आहे. आपली राजकीय सुसंस्कृत परंपरा जपत येणाऱ्या काळात चुकीच्या गोष्टींना उत्तर द्यावेच लागेल असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.








