कोपरगावकरांसाठी ऐतिहासिक क्षण, सुवर्णाक्षरांनी होणार नोंद
देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह करणार देशातील पहिला सहकारी सी बी जी प्रकल्प उद्घाटनकोल्हे कारखाना ठरला अग्रेसर, विविध प्रकल्पांचे उद्घाटन व शेतकरी सहकार मेळावा पार पडणार
साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून, उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरु झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊसप्रक्रियेतील वाया जाणाऱ्या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल निर्मिती केली जात आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


दररोज १२ टन सीएनजी निर्मितीची क्षमता अन्नदाता ते उर्जादाता या संकल्पनेतून संजीवनी उद्योग समूहाचे कारखान्यात हा अत्याधुनिक सीएनजी प्रकल्प उभारला आहे.या प्रकल्पातून दररोज १२ टन सीएनजी निर्मिती होणार असून, तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठीही हा उपक्रम वरदान ठरणार आहे.तसेच वाहतूक क्षेत्राला आर्थिक खर्च कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा होणार पुनर्वापर : कारखान्याचे सांडपाणी व डिस्टिलरी स्पेंडमधून मिथेन वायू वेगळा करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची ही प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरणारी आहे.

ना.अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषद सभापती राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यावतीनेही सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे.अशी माहिती कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली आहे.

सर्व कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील असा ऐतिहासिक सुवर्ण क्षण 5 ऑक्टोबर रोजी कायमस्वरूपी कोपरगावच्या विकासाच्या क्रांतीत अग्रस्थानी नोंदवला जाईल अशी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी दिली आहे.




