तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी- गटविकास अधिकारी दळवी
तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी- गटविकास अधिकारी दळवी
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १६ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित साधून या अभियानाची बुधवार दिनांक १७ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे हे अभियान ३१ डिसेंबर पर्यंत चालणार असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांनी दिली आहे.
जाहिरात
गटविकास अधिकारी दळवी यांनी या अभियानाचा उद्देश सांगताना सांगितले की, सुशासन युक्त पंचायत तयार करणे, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, गावे जलसमृद्ध स्वच्छ व हरित करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे, उपजीविका विकास करणे व सामाजिक न्याय देणे,लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.तर याबाबत प्रशासनामार्फत ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळवून “आदर्श ग्रामपंचायत” घडविण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येत आहे.जाहिरात
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे अंमलबजावणी व सनियंत्रण ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती करणार आहे. तसेच प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार साठी ग्रामपंचायतीची निवड करण्याकरिता जिल्हास्तरावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुकास्तरावर माननीय गटविकास अधिकारी हे मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतील