आपला जिल्हा

निरोगी आयुष्य जगण्यासाठी वयाची अट नसते – आमदार सत्यजित तांबे

निरोगी आयुष्य जगण्यासाठी वयाची अट नसते – आमदार सत्यजित तांबे
निरोगी आयुष्य जगण्यासाठी वयाची अट नसते – आमदार सत्यजित तांबे
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ७ जानेवारी २०२६- सहकारमहर्षी स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच माध्यमातून या शिक्षण संस्थेतून व महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी महाविद्यालयाची संपत्ती असल्याचे मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

जाहिरात
      सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्नेहतरंग’ या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या प्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते. बहुजन समाज म्हणजे खऱ्या अर्थाने शेती करणारा समाज अशी सरळ साधी व्याख्या करून आ तांबे यांनी स्व.दादांनी शेतकरी समाजासाठी केलेल्या शेती व शैक्षणिक कार्याची जाणीव करून देउन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जाहिरात

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ,आय.क्यु.ए.सी.समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संतोष सुर्वे, माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.सत्यजित तांबे म्हणाले की,या महाविद्यालयातून केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे तर माणूस म्हणून घडलेले माजी विद्यार्थी आज विविध माध्यमातून समाजाच्या व देशाच्या जडणघडणीत आपले योगदान देत आहेत. त्यांनी आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या धावपळीच्या युगात निरोगी जीवनमान राखण्याचे आव्हान उभे आहे. त्यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी योग्य आहार,व्यायाम,शारीरिक श्रम यावर भर दिला पाहिजे. यासाठी वयाचे कोणतीही अट नसते. वयाच्या कोणत्याही कालावधीत आपण यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहचू शकतो त्यासाठी आपली सकारात्मक इच्छाशक्ती व मनाची तयारी असावी लागते. त्यासाठी आपल्या माजी विद्यार्थ्यांनी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य केले तर ते सहज शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सह्याद्री हे आपले कुटुंब असून आपण सर्वच कुटुंबाचे घटक आहोत म्हणून या कुटुंबाचा प्रमुख घटक या नात्याने आपली कोणतीही अडचण अथवा समस्या असो ती सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असे आश्वासन आमदार सत्यजित दादा तांबे यांनी उपस्थित यांना दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाळासाहेब वाघ यांनी केले. स्नेह मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थी अॅड.श्री.गोपीनाथ घुले,प्रो.गोरक्षनाथ सानप,प्रो.अनिल लांडगे सर,कुमारी रिदा मणियार,सतीश नेहे,विक्रम गवांदे,सतीश पवार,ह.भ.प.पोपट आगलावे,दिलीप कचेरे,दिपक डगले.अमोल पांडे, नंदू पाटोळे,प्रशांत काकड,अजित दिघे इत्यादींनी आपले विचार व्यक्त करून महाविद्यालयाबद्दल आदरभाव व्यक्त केला.

तसेच याप्रसंगी महाविद्यालया प्रति सद्भावना व्यक्त करताना सर्व सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले तर प्रा. संतोष सुर्वे यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागास भेट देऊन महाविद्यालयाच्या प्रगती बदल व नवीन सुरु केलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. सदर चा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे