आपला जिल्हा

सध्याच्या धावपळीत योगसाधना अत्यंत महत्त्वाची- योगगुरु उत्तमभाई शहा

सध्याच्या धावपळीत योगसाधना अत्यंत महत्त्वाची- योगगुरु उत्तमभाई शहा

सध्याच्या धावपळीत योगसाधना अत्यंत महत्त्वाची- योगगुरु उत्तमभाई शहा

Kopargaon vijay kapse दि. २१ जुन २०२६- प्रत्येकाचे जीवन भौतीक धावपळीमुळे धोक्याचे झाले आहे, अती श्रम, अती भ्रमणध्वनीचा वापर, निकस अन्न, कमी झालेली झोप, अॅलोपॅथी औषधांचा अतिरिक्त वापर, भेसळ, नैसर्गिक असंतुलन यामुळे प्रत्येकजण जीवनांत निराश झालेला आहे. नैराश्यातून शांतता शोधत आहे, ती योगोपासनेत आहे तेव्हा कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने स्वतःसाठी योगसाधना केलीच पाहिजे असे प्रतिपादन योगतज्ञ उत्तमभाई शहा यांनी केले.

जाहिरात
           जागतिक योगदिनाच्या पूर्वसंध्येला आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन त्यांच्याकडून योगोपासना जाणून घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीयोगसाधनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत १७७ देशांचा पाठींबा मिळवून गेल्या ११ वर्षापासुन योगदिन् आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा होत आहे, अशी आठवण करून देत ते म्हणाले की, आपली युवा पिढी यामाध्यमांतून सशक्त होईल. तरुणांनी भ्रमणध्वनीचे व्यसन सोडुन योगसाधनोला आत्मसात करावे.

जाहिरात
         गेल्या सहा दशकापासुन (६० वर्ष) कोपरगांव शहरासह महाराष्ट्र राज्याबरोबरच देश विदेशातील साईभक्त, दुर्धर आजारांने पिडीत, तरूण तरूणी, सिने अभिनेते-अभिनेत्री, समाजकारणी, राजकारणी आदि असंख्य क्षेत्रात काम करणा-यांना  उत्तमभाई शहा योगसाधना शिकवत आहेत.ते भारतीय शास्त्रात योगोपचार पध्दती अत्यंत कमी खर्चात आणि गुणकारी आहे. योगतज्ञ स्वामी बाबा रामदेव यांनी तर योगप्रसाराचे अव्यहत कार्य सुरू ठेवलेले आहे. पतंजली यांनी ही योग कला तुमच्या आमच्या पर्यंत सर्वप्रथम पोहोचवली आहे. हिंदू, जैन, बौद्ध धर्मात ध्यानाला विशेष महत्त्व आहे.

जाहिरात
           शरीर श्वास आणि मन यांना जोडणारी साधना म्हणजे योग होय. हजारो वर्षापासुन ही योगसाधना चालत आलेली आहे. पतंजली ऋषींनी अष्टांग योग शास्त्रात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, आणि समाधी ही आठ अंगे सांगितली आहेत. तेंव्हा प्रत्येकांने बदलत्या जीवनशैलीत योगकला आत्मसात केलीच पाहिजे. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीमध्ये त्याचा सतत अंर्तभाव झाला पाहिजे.
          योगामुळे ताण तणाव कमी होवुन मनुष्याला कठीण परिस्थितीत कसे सामोरे जायचे याचे आकलन प्राप्त होते. जगांने २०२१-२०२२ मध्ये कोरोना सारखी महामारी अनुभवली, आजही कोरोनाचे रूग्ण आपल्या महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यात आढळत आहे. फुफुसे कमकुवत झाल्यांने अनेकांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. मात्र योगसाधनेत प्राणायामामुळे फुफूस श्वसनक्षमता सुधारून त्यास नवचेतना मिळते. कोपरगांव ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमांतुन ज्येष्ठांचे आरोग्य अबाधीत रहावे यासाठी योगसाधनेचा नियमीत उपक्रम आपण अनेक वर्षापासून मोफत राबवत आहोत, माझेबरोबरच माझे चिरंजीव अभिजितने देखील माझेकडुन योगसाधनेचे धडे घेतले आहे, तो देखील अनेकांना योगसाधना शिकवत आहे. 
        भारत देशासह जगभरात १० वैशिष्टयपुर्ण उपक्रमांसह योगाभ्यासाचा प्रसार, शालेय जीवनांत योगाभ्यासाच्या धड्यांचा समावेश, दहा भागीदार देशांच्या अदान प्रदान मधुन योगसाधनेला बळ दिले जाणार आहे. योग ही लोकोपयोगी चळवळ आहे तिला प्रत्येकाच्या सहभागाने व्यापक बनवावी हीच याप्रसंगी इच्छा आहे असे सांगुन उत्तमभाई शहा यांनी चर्चेचा समारोप केला. शिर्डीचे साई संस्थान, कोकमठाण चे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, साकुरी राहता येथील उपासनी आश्रम हे व त्यांचे सहकारी योग साधनेला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे