आपला जिल्हा

टीईटी,नीट पेपर फुटी प्रकरणी एनएसयुआयचे निवेदन

टीईटी,नीट पेपर फुटी प्रकरणी एनएसयुआयचे निवेदन

टीईटी,नीट पेपर फुटी प्रकरणी एनएसयुआयचे निवेदन

Sangmner vijay kapse दि २ जुलै २०२६देशभरात झालेल्या नीट पेपर फुटी व राज्यभरात झालेल्या टीईटी पेपर फुटी मुळे शिक्षण क्षेत्राबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे .यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. आरोपींवर तातडीने  कारवाई करावी या मागणीसाठी युवा नेत्या डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष शेखर सोसे नेतृत्वाखाली एनएसयूआयच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जाहिरात
प्रांताधिकारी कार्यालय येथे जिल्हा अध्यक्ष शेखर सोसे, आदित्य बर्गे,गौरव गुंजाळ, ओमकार शेटे, सुदर्शन शिंदे, सार्थक गुंजाळ ,प्रितम साबळे, सुदर्शन सानप ,दिपक शिंदे, आलोक बर्डे ,भूषण वाकचौरे, सार्थक सातपुते, हार्श रणखांबे ,सिद्धू बढे उपस्थीत होते.

जाहिरात

या निवेदनात म्हटले आहे की, नीट आणि टीईटी सारख्या परीक्षांसाठी विद्यार्थी खूप परिश्रम करतात मात्र पेपर फुटी मुळे सर्वांचा भ्रमनिरास होतो. अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. वर्षभर कष्ट करताना त्यांचा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च , जेवणाचा खर्च,फॉर्म फी, मानसिक तणाव या सगळ्या बाबींचा त्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होतो इतके करूनही तो कष्ट करतो आणि अचानक पेपर फुटी मुळे त्याचा अपेक्षाभंग होतो यामध्ये अनेक दलाल पैसे कमवत असून यामुळे शिक्षण क्षेत्र हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.

जाहिरात

त्यामुळे शासनाने भविष्यात पेपर फुटी थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अधिक पारदर्शकता राबवावी व या प्रकरणी उच्चस्तरीय निपक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच फेर परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी एन एस यु आय व युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे