स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घोरपडवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घोरपडवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घोरपडवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
Akole vijay kapse दि १६ ऑगस्ट २०२६– स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोरपडवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघाचे राज्य सरचिटणीस तथा समर्थ गावकरी वृत्तपत्राचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले.शैक्षणिक साहित्याची भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे आणि समाजातील विविध घटकांनी शिक्षणाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित पालक व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला.

शाळेचे मुख्याध्यापक रंगनाथ भोसले यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी आहे. शैक्षणिक साहित्याची मदत ही केवळ वस्तूंचे वाटप नसून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी बाब आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तसेच डॉ. विश्वासराव आरोटे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील विविध घटकांनी अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपाध्यापक रमेश खरबस यांनीही मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि डॉ. विश्वासराव आरोटे यांचे आभार मानले.ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना मिळणारे असे प्रोत्साहन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य या उपक्रमातून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर मेंगाळ, उपाध्यक्ष योगेश मेंगाळ, माजी अध्यक्ष दिनकर गावंडे, अनिल मेंगाळ, शिवराम गावंडे, चिमण मेंगाळ, अनिता मेंगाळ, नंदिनी मेंगाळ, विजय गंगाराम मेंगाळ, रामनाथ मेंगाळ, सोमनाथ गावंडे, गोरख गावंडे, विलास मेंगाळ, किरण गावंडे, चिमणबाई मेंगाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या हातात पुस्तक, वही आणि लेखणी देणे म्हणजे देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे होय. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा आणि त्यांच्या शिक्षणाला थोडेसे प्रोत्साहन मिळावे, या भावनेतून आम्ही अनेक शाळांमधून हा उपक्रम राबविला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी संधी मिळू शकते.- डॉ. विश्वासराव आरोटे



