आपला जिल्हा

भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे यांचा कोपरगांव मंडलातील टाकळी येथे ‘शेतकरी संवाद’

भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे यांचा कोपरगांव मंडलातील टाकळी येथे ‘शेतकरी संवाद’
भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे आ.विवेक कोल्हेंसमवेत चर्चेसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६-कोपरगाव मंडलातील टाकळी येथे भाजपा प्रदेश महामंत्री मा.आ.सुनील राणे यांनी आमदार विवेक कोल्हे यांच्या समवेत शेतकरी संवाद उपक्रमातून उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.पीक कर्ज, पीक विमा, हमीभाव, पाटपाणी, सिंचन, पाणी व्यवस्थापन, शेतीमालाची बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.प्रदेश महामंत्री थेट शेतकरी संवादासाठी आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

जाहिरात
यावेळी सुनील राणे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत शेतीसमोरील प्रश्न केवळ ऐकून न घेता त्यामागील कारणे, शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. पीक विमा, शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन व्यवस्था आणि उत्पादन खर्च याबाबत शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेत संबंधित प्रश्न शासनाच्या पातळीवर मांडण्याबद्दल मार्गदर्शन केले.
जाहिरात
आ. विवेक कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील पाटपाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत उपलब्ध पाण्याचे प्रभावी नियोजन करून शेतकऱ्यांना नियमित व पुरेसे पाणी मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. वाढता उत्पादन खर्च आणि त्याप्रमाणात न मिळणारा शेतमालाचा दर ही शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.पीक विम्याबाबत आ. कोल्हे म्हणाले की, शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरत असतानाही नुकसान झाल्यानंतर जाचक अटी व किचकट प्रक्रियेमुळे भरपाई मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे पीक विमा योजना अधिक पारदर्शक, सुलभ आणि शेतकरीपूरक करण्याची गरज आहे.
कोपरगावला समृद्धी महामार्ग, विमानतळ व रेल्वे मालवाहतुकीच्या सुविधा जवळ उपलब्ध असल्याने या भौगोलिक अनुकूलतेचा शेती विकासासाठी उपयोग करता येईल. तालुक्यात आधुनिक शीतगृहे, स्टोरेज व साठवणूक केंद्रे उभारल्यास शेतकऱ्यांना माल साठवून योग्य वेळी योग्य दरात विकता येईल आणि नासाडी कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही आ. कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न व सूचना मांडल्या. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणारा शेतकरी संवाद उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,अशोक पवार,सरपंच संदीप देवकर, शरदनाना थोरात,माजी सभापती सुनील देवकर,मंडलाध्यक्ष सुनील कदम, दिपक चौधरी,संचालक निलेश देवकर, रमेश घोडेराव, अंबादास देवकर, अंबादास कारभारी देवकर, राजेंद्र निवृत्ती देवकर, अनुराग येवले,पी. टी. देवकर, ज्ञानदेव राहणे , टी. वी. देवकर, दादासाहेब पाईक, बद्रीनाथ सांगळे, प्रवीण सांगळे, विनोद सांगळे, अनिल सांगळे, रमाकांत वाकचौरे, संपत वहाडने, शांताराम बनकर, अशोक बनकर, संजय वाबळे, किरण सुराळकर, निलेश वराडे, कैलास जाधव, मनेश देवकर, गणेश थोरात, अल्लाउद्दीन शेख, सादिकभाई शेख,चेतन कोते,संजय देवकर, गणेश देवकर, सूर्यभान देवकर, शरद आहेर, स्वप्निल देवकर, वामनराव जाधव, विजय देवकर, बाळासाहेब देवकर, शांताराम बनकर, निलेश देवकर, संदीप आसने, दादापाटील आसने,धोंडिबा सांगळे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे