कोपरगाव विजय कापसे दि ३० एप्रिल २०२५-सामाजिक कार्यकर्ते तसेच बालविवाह मुक्त भारत माझं गाव बालविवाह मुक्त गाव अभियान राबवणारे डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या प्रयत्नातून हा बालविवाह रोखण्यात आला असून यासाठी महिला बालकल्याण अधिकारी रूपाली धुमाळ तसेच गटविकास अधिकारी संदीप दळवी साहेब महिला समुपदेशक वैशाली झाल्टे,अंगणवाडी सुपरवायझर लता येडेकर, ग्रामसेवक राजेंद्र टिळेकर, सरपंच अमोल ओताडे तसेच अंगणवाडी सेविका उज्वला भालेराव ,शिर्डी पोलीसचे पोलिस निरीक्षक गलांडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोराणे आदींचे सहकार्य लाभले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोक गावीत्रे यांनी दिली आहे.
जाहिरात
सदर मुलीचा साखरपुडा झालेला होता व लग्नाची तयारी सुरू होती ती अल्पवयीन असल्यामुळे लग्न केल्यास काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आलि व त्यांचे समुपदेशन करून सदर विवाह रद्द करून मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार न सल्याचे मुलीचे आई-वडील यांनी सांगितले तसेच ग्राम बाल संरक्षण समिती समोर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार असल्याचे लिहून देखील दिले असून मुलीने देखील पुढे शिकायचे असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली अठरा वर्षाखालील मुलीचा व २१ वर्षाखालील मुलाचा विवाह करणे म्हणजे बालविवाह असून तो गुन्हा आहे.जाहिरात
कमी वयात मुलीची गर्भधारणा झाल्यास आई व बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो बाळाची वाढ कमी होऊ शकते त्यामुळे वय पूर्ण झाल्यावरच पालकांनी योग्य वेळ येताच विवाह करणे अपेक्षित आहे गावात बालविवाह होऊ नये यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून सरपंच,पोलीस पाटील ,ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका यांची प्राथमिक जबाबदारी आहे या समितीने बालविवाह होत असल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षा ला माहिती देणे आवश्यक आहे.
बालविवाह लावणाऱ्या पुरोहितांस सह मंडपवाले, आचारी छायाचित्रकार ,वाद्यांची ऑर्डर घेणाऱ्या सह नातेवाईकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो बालविवाह प्रथा ही बालहक्क विरोधी असून बालविवाह प्रतिबंध अधिनियम २०१६ नुसार असे बालविवाह बेकायदेशीर ठरतात १०९८ किंवा ११२ या टोल फ्री क्रमांक आवरून माहिती दिल्यास तक्रार ची दखल घेऊन कारवाई केली जाते राज्यात मागील सहा वर्षात ५४२१ बालविवाह थांबविण्यात यश आले असून ४०१ एफ आय आर दाखल करण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात अनेक सामुदायिक विवाह आयोजित केले जातात यामध्ये देखील बालविवाह मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते याबद्दल आपल्याला माहिती मिळाल्यास त्वरित १०९८ या नंबर वरती कॉल करण्याचे आवाहन डॉ.अशोक गावित्रे यांनी केले आहे.