स्व.शंकरराव कोल्हे साहेब जयंती आदिवासी समाजाचा प्रश्न सुटण्यासाठी ठरली प्रेरणादिन

कोपरगाव विजय कापसे दि २४ मार्च २०२५–कोपरगाव मतदारसंघातील रवंदे गावातील ४० आदिवासी कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती. या रहिवासी नागरिकांच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना बेघर व्हावे लागणार होते.त्यामुळे हा निर्णय दुर्देवी असल्याने आदिवासी समाजाची अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली.यामुळे एकलव्य संघटनेच्या वतीने या अन्यायाविरोधात सोमवार १७ मार्चपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू होते. २४ मार्च ही माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती प्रेरणादिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते आहे. स्व.कोल्हे यांचे मोठे काम आदिवासी समाजाच्या बद्दल होते. आदिवासी दाखले, जागा, रोजगार, घरे, उपजिविकेसाठी पशुपालन प्रकल्प असे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. आदिवासी समाजासमोर वर्तमान स्थितीत उद्भवलेला प्रश्न सुटण्यासाठी सुरू झालेली मोहीम ही त्यांच्याप्रती प्रेरणारूपी आदरांजली आहे असे चित्र बघायला मिळाले.





