आपला जिल्हा

आमदार काळें वरील सर्व आरोप बिन बुडाचे-काळे गट

आमदार काळें वरील सर्व आरोप बिन बुडाचे-काळे गट

विवेक कोल्हे यांनी आमदार काळेंवर केलेल्या आरोपांना काळें गटाकडून जोरदार प्रतिउत्तर
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ नोव्हेंबर २०२५शनिवारी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार आशुतोष काळे यांच्यावर केलेले सर्व आरोप बिन बुडाचे असल्याचा  जोरदार पलटवार काळे गटाचे मंदार पहाडे, विरण बोरावके, कृष्णा आढाव व सुनील गंगुले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केला आहे.

जाहिरात

या पत्रकार परिषदेत मंदार पहाडे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून आमदार काळे यांच्यावर आरोप केले जात आहे. पाणी प्रश्नावर राजकारण करणारे त्यांच्याकडे ४० वर्ष सत्ता असताना शहराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा असलेला पाणी प्रश्न ते का सोडू शकले नाही? ५ नंबर तळ्याच्या निर्मितीला खोडा कोणी घातला? हे जनतेला माहिती आहे त्यामुळे तळ्याचे  अर्धवट काम लवकरच पूर्ण होऊन दादांनी १ ते २ दिवसात पाणी देण्याचा दिलेला शब्द लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगत शहरातील स्विमिंग पूल कोणी खाल्ला? साईगाव पालखी रस्ता कोणी खाल्ला? एसटी स्टँडचे नियोजन शून्य काम करत त्याचे निकृष्ट काम कोणी केले? शहरात निकृष्ट काम करणारे ठेकेदार कोण? हे सर्व माहीत असताना देखील आमदार काळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात हे सर्व निंदनीय असून आम्ही या सर्वांचा जाहीर निषेध करतो असे मंदार पहाडे यांनी सांगितले.

जाहिरात

तर विरेन बोरावके यांनी सांगितले की, कोपरगावात कोणतेही दृश्य स्वरूपातील काम झालेले नाहीत असा आरोप आमदार काळे वर केला जात आहे, अहो ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत, ग्रामीण पोलीस स्टेशन वसाहत, उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती, दिवाणी न्यायालयाची इमारत, न्यायाधीश निवासस्थान असे कितीतरी दृश्य स्वरूपातील कामे आहे की ज्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहेतच त्यासोबतच व्यापारी व नव उद्योजकांच्या दृष्टीने ३ व्यापारी संकुलांची कामे प्रगतीपथावर आहे तर एकाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. तसेच कोपरगाव नगरपालिका इमारतीत व शासकीय आयटीआय कॉलेजच्या इमारतीत आवश्यक ते फर्निचर व साहित्य साठी निधीची उपलब्धता करून दिली आहे तर शहरातील वेगवेगळ्या समाजाच्या मंदिर सभागृहांसाठी देखील मोठा निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आमदार काळेंवर आरोप करणे हे चुकीचे असल्याचे बोरावके यांनी सांगत जनता त्यांच्या भुलथापाना  कधीही बळी पडणार नाही असा विश्वास बोरावके यांनी व्यक्त केला.

जाहिरात

कृष्णा आढाव यांनी सांगितले की, शहरात कोणत्याही सामाजिक सभागृहाला काळेंनी निधी दिला नाही असा आरोप केला अहो सभागृहास निधी देण्याची प्रथा माजी आमदार अशोक काळे यांनी सुरू करत तीच प्रथा आमदार आशुतोष काळे यांनी सुरू ठेवत शहरासह तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या सभागृहांना भरघोस निधी दिला आहे त्यामुळे बिन बुडाचे आरोप आमदार काळेंवर करण्यापेक्षा अभ्यास करून आरोप करावे असा उपरोधिक सल्ला आढाव यांनी विवेक कोल्हे यांना देत जनता आता पूर्णपणे सुज्ञ झाले असून आपण करत असलेल्या चुकीच्या अपप्रचाराला कधीच बळी पडणार नसून विकासाची कास धरून आमदार काळे चालले असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या निवडणुकीत आमदार काळे जे उमेदवार देतील त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आढाव यांनी कोपरगावासीयांना केले आहे.

जाहिरात
सुनील गंगुले याप्रसंगी म्हणाले की, खोटे बोल पण रेटून बोल अशीच त्यांची कालची पत्रकार परिषद म्हणावी. २०१४ ते २०१९ ची परिस्थिती काय होती हे सर्वांना माहिती आहे परंतु २०१९ नंतर आमदार काळे यांच्या कार्यकाळात गावातील सर्व रस्त्यांची निर्मिती करत धुळगाव ही ओळख पुसली आहे. तर शहरातील नागरिकांच्या दृष्टीने मूलभूत विकासाच्या गोष्टीची पूर्तता करत शहराची वाटचाल विकसित शहराकडे जात असताना पाण्यापासून नागरिकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भूलथापांना जनता बळी पडणार नाहीत. बस स्टँडचे काम निकृष्ट झालेच पण ते नियोजनबद्ध केले असते तर युवकांना शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आले असते. आमदारावर आरोप करणारे त्याच रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कुणाचे आहे. त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरलेली २८ कामे न करण्याच्या विरुद्ध कोर्टात कोण गेले आणि अचानक तिथून माघार का घेतली हा एक संशोधनाचा भाग आहे? आमदार आशुतोष काळेंनी शहरात बांधलेल्या सर्वच इमारतीमुळे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे हे सर्व जनता जाणते आहेत त्यामुळे आमदार काळे वर असे आरोप केले तर त्याला आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ असा इशारा गंगूले यांनी देत आमदार काळे जे उमेदवार नगरपालिकेच्या निवडणुकीत देतील त्या सर्वांना आपण सर्व भरघोस मतांनी निवडून देत राज्यात विकासाच्या दृष्टीने शहराला १ नंबर वर नेऊन ठेव असा विश्वास गंगुले यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे