आपला जिल्हा

आ.विवेक कोल्हे यांच्या मागणीवरून गोदावरी घाट विकासासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

आ.विवेक कोल्हे यांच्या मागणीवरून गोदावरी घाट विकासासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आ.विवेक कोल्हे यांच्या विविध मागण्यांना येणार यश
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २६ ऑगस्ट २०२६कोपरगाव येथील गोदावरी नदी तीरावर आगामी नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आ. विवेक कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्यक्ष पाहणी केली. घाटावर रिटेनिंग वॉल, सुशोभीकरण तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी-सुविधा उभारण्याची मागणी आमदार कोल्हे यांनी केली होती.यासह पुणतांबा येथील घाटाचे काम व कोपरगाव रेल्वे स्टेशन विकास आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर विविध रस्ते विकासाचे कामे मार्गी लावण्याची आ.विवेक कोल्हे यांची मागणी व नगरपरिषदेने विविध विकासकामांचे दिलेले प्रस्ताव तातडीने कार्यवाही करू अशी भूमिका ना.महाजन यांनी मांडली आहे.

जाहिरात
या विकासकामांसाठी आवश्यक तो निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.कोपरगाव येथे दि. 25 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंत्री गिरीश महाजन हे कोपरगाव येथे आले होते. या दौऱ्यादरम्यान आ.विवेक कोल्हे यांनी त्यांना गोदावरी नदी तीरावरील घाटाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार मंत्री महाजन यांनी नदी तीरावर जाऊन घाटाची सद्यस्थिती तसेच भविष्यात करावयाच्या विविध विकासकामांची माहिती घेतली.

जाहिरात
कोपरगाव हे विविध पौराणिक महत्व असणारे आहे.कोपरगाव व पुणतांबा येथे अनेक भाविक श्रावण मासात व कुंभ काळात स्नानासाठी येतात.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे कोपरगाव येथील गोदावरी नदीला विशेष धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकला येणारे भाविक या भागात येतील.येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने घाट परिसराचा विकास महत्त्वाचा ठरणार आहे.यासह रस्ते व पथदिवे,अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन,उद्यान विकास, वृक्ष लागवड, शारिरीक व्यायाम,घाट सुशोभीकरण असे अनेक प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे.
यावेळी आ.विवेक कोल्हे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पूर परिस्थितीमध्ये कोपरगाव शहराच्या बहुतांश भागात पाणी शिरते त्यामुळे गोदावरी तीरावरील संरक्षक भिंत(रिटेनिंग वॉल) उभारणे, घाट बांधणे व परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच जॉगिंग ट्रॅक यासह पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी-सुविधा निर्माण करणे यासाठी आवश्यक विकासकामे हाती घेण्याची मागणी केली.तसे प्रस्ताव देखील नगरपरिषदेने केलेले आहे.भाविकांसाठी हा परिसर अधिक सुरक्षित व सुविधायुक्त व्हावा, तसेच गोदावरी नदी तीराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता यावे, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
मंत्री गिरीश महाजन यांनी घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित विकासकामांची माहिती घेतली. या कामांसाठी शासनस्तरावरून आवश्यक सहकार्य करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावच्या गोदावरी तीरावरील घाट विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या पाहणीप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत,नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. गोदावरी तीरावरील घाटांचा नियोजनबद्ध विकास झाल्यास आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोपरगाव अधिक सज्ज होण्यास मदत होणार असून, शहराच्या धार्मिक पर्यटनालाही नवी चालना मिळणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे