आपला जिल्हा

ज्ञानगंगा एज्युकेशन च्या स्कॉलरशिप परीक्षेत कोपरगावची कीर्ती गवळी राज्यात द्वितीय तर ५१ हजाराची स्कॉलरशिप पटकावली.

ज्ञानगंगा एज्युकेशन च्या स्कॉलरशिप परीक्षेत कोपरगावची कीर्ती गवळी राज्यात द्वितीय तर ५१ हजाराची स्कॉलरशिप पटकावली.

ज्ञानगंगा एज्युकेशन च्या स्कॉलरशिप परीक्षेत कोपरगावची कीर्ती गवळी राज्यात द्वितीय तर ५१ हजाराची स्कॉलरशिप पटकावली.

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ मे २०२५ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेअंतर्गत डिसेंबर महिन्यात बारावी विज्ञान शाखेकरिता घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय बोर्ड पूर्व लाईव्ह परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील कु. कीर्ती विजय गवळी या विद्यार्थिनीने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. त्यासाठी संस्थेच्या वतीने तिला ५१ हजार रूपयांची स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली. यासाठी तिला ज्ञानगंगाच्या तनेश लोंगाणी सरांचे मार्गदर्शन मिळाले होते. त्याचबरोबर याच परीक्षेत प्रथम आलेल्या नारायणगाव येथील कु.अर्पिता हांडे हिला १ लाख रूपयांची व तृतीय आलेल्या इस्लामपूर येथील कु.पायल चव्हाण हिला २१ हजार रूपयांची स्कॉलरशिप देण्यात आली. नारायणराव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयातील वसंत व्हीला येथे हा शिष्यवृत्ती वितरण समारंभ मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.कृषीरत्न अनिल मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

जाहिरात

‘स्वयंअध्ययनातून सर्वोत्तम शिक्षण’ हे ब्रीदवाक्य असलेली ज्ञानगंगा एज्युकेशन ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आत्तापर्यंत आमच्याशी जोडला गेलेला विद्यार्थी विज्ञान शाखेत ६० टक्के पेक्षा खाली आलेला नाही. आमच्या राज्यभरातील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी केवळ स्वयंअध्ययनातून यशाच्या उंच शिखरावर पोहोचत आहे याच आम्हाला समाधान आहे, असे मत ज्ञानगंगा एज्युकेशनचे संस्थापक श्री.अमोल आरकस यांनी मांडले.

जाहिरात

यावेळी गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे म्हणाले, ज्ञानगंगा एज्युकेशनच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्याला सीईटी आणि एचएससी बोर्ड परीक्षेत संतुलन राखता येत आहे तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या यशात हमखास भर पडत आहे. ज्ञानगंगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येणारी आमच्या विद्यालयाची विद्यार्थीनी कु.अर्पिता हांडे ही या परीक्षेमुळे विद्यालयात सुद्धा प्रथम आली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

जाहिरात गौतम

ज्ञानगंगा एज्युकेशन च्या डिसेंबर महिन्यात अगदी बोर्डाच्या वातावरणात झालेल्या परीक्षेमुळे आम्हाला आमची किती तयारी झाली आहे हे अगोदरच कळाले आणि आमच्या चुका सुधारण्यास मदत झाली. संस्थेच्या सर्व शिक्षकांचे सातत्यपूर्ण योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही हे यश मिळवले, यासाठी आम्ही ज्ञानगंगा एज्युकेशनचे आभारी आहोत असे प्रतिपादन स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांनी केले.

जाहिरात

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रथम येणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार फेटे बांधून व त्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम, एक रोपटे व ट्रॉफी देऊन करण्यात आला. यावेळी ज्ञानगंगा एज्युकेशनचे विभागीय संचालक अन्सार मुल्ला सर,  आरकस सर, आणि इतर शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक  अमोल आरकस यांनी, सूत्रसंचालन रमेश शेटे यांनी तर ज्ञानगंगा एज्युकेशनचे  तनेश लोंगाणी यांनी सर्वांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे