आपला जिल्हा

महिलेच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करा

महिलेच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करा
सकल आंबेडकरी समाजाची मोर्चा काढत मागणी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० जुन २०२५ शस्त्रक्रिया करतांना  हलगर्जीपणा केल्याने अर्चना माधव शिंगाडे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल कोपरगाव शहरातील डॉ मयूर त्रिरमखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणी साठी कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

जाहिरात

दिलेल्या निवेदनात मृत महिलेचे पती माधव प्रभाकर शिंगाडे राहणार ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव यांनी म्हटले आहे की, माझी पत्नी  अर्चना माधव शिंगाडे ही तीन महिन्याच्या गरोदर असताना त्यांची ट्रीटमेंट कोपरगाव शहरातील डॉ तिरमखे यांच्या कडे चालू होती दि २२ मे २०२५ रोजी नियमित तपासणी साठी ती त्यांचा कडे गेली असता डॉक्टरांनी सोनोग्राफी करत गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही व गर्भवाढीसाठी २० दिवसाच्या गोळया दिल्या सदर गोळ्या घेतल्या नंतर दि २४ मे २०२५ रोजी तिला रक्त स्त्राव चालु झाला व पोटात दुखायला लागले असता दि २५/ल मे २०२५ रोजी सकाळी पुन्हा डॉ तिरमखे यांच्याडे तपासणीस नेले असता डॉ तिरमखे यांनी पुन्हा सोनोग्राफि केली असता गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाला असून तो गर्भ काढावा लागेल असे सांगितले. गर्भ खराब झाल्यामुळे आम्ही सहमती दिली गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या रक्तस्राव देखील खूप होत होता.

जाहिरात

परंतु डॉक्टर मयूर तिरमखे यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला. आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि २६ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सोनोग्राफी पुन्हा केली. तो रिपोर्ट डॉक्टर तिरमखे यांना दाखवला रिपोर्ट नॉर्मल आहे असे सांगून घरी जाण्यास सांगितले परंतु तिला त्रास कमी झाला नाही ते म्हणाले पोटात जे दुखतंय ते वेगळे आहे. आणि गर्भात ही वेगळं हे सांगितले असता त्यानंतर  आम्ही कोपरगाव येथील डॉक्टर फडके यांच्याकडे गेलो असता त्यांनी औषध उपचार चालू केला तेव्हा डॉक्टर फडके यांनी तपासणी केली असता पोटात सेप्टिक झाले आहे.

जाहिरात गौतम
तर ऑपरेशन करावे लागेल. आमच्याकडे ऑपरेशन सुविधा आहे. त्यानुसार आम्ही ऑपरेशन करण्यास सहमती देत दिनांक २८ मे २०२५ रोजी ऑपरेशन झाले परंतु पोटात दुखायचा त्रास कमी झाला नाही दोन दिवस औषध उपचार चालू असताना दि ३० मे २०२५ रोजी तिचा मृत्यू झाला. तरी डॉ मयुर तिरमखे  यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळेच माझी पत्नी अर्चनाचा मृत्यू झाला तरी तिच्या मृत्युस डॉ मयूर तिरमखे हेच सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांनी बेकायदेशिर गर्भपात केला असल्याने त्यांच्या वर सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हिच विनंती व मला व माझ्या तिन मुलींना न्याय मिळावा असे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व धार्मिय समाज उपस्थित होता.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे