दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सेवा हाच धर्म मानून कोल्हे परिवार कायम तत्पर – रेणुका कोल्हे
दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सेवा हाच धर्म मानून कोल्हे परिवार कायम तत्पर – रेणुका कोल्हे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २२ मार्च २०२६-आम्हाला समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांचे जीवन जगण्यासाठी योग्य ते साधन उपलब्ध करून द्यायचे आहे.यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच पुणे येथील साधू वासवानी ग्रुपशी संलग्न होऊन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिव्यांग बंधू आणि भगिनींना स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन साजरा होतो.या निमित्ताने कृत्रिम अवयव मिळवून देण्याचा महत्त्वाचा उपक्रम कोपरगाव मतदारसंघात सुरू केला आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त दिव्यांग बंधू आणि भगिनींनी येऊन लाभ घ्यावा.तसेच दिव्यांग बंधू-भगिनींना कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास आमच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह कोल्हे परिवार कायम तत्पर असल्याचे प्रतिपादन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी केले.
जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठान व साधू वासवानी ग्रुपच्या वतीने (दि. २४ मार्च) सहकार महर्षी, माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अपघात किंवा इतर कारणांनी नैसर्गिक अवयव गमावलेल्या दिव्यांग गरजू व्यक्तींना मोफत साहित्य व प्रमाणपत्रांचे वाटप संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, नारायणशेठ अग्रवाल, नगरसेवक आकाश वाजे, संतोष गंगवाल, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, स्वप्निल कडू, डॉ. मिलिंद जाधव, योगेश गंगवाल, फकीरमहमंद पहिलवान, खालीकभाई कुरेशी, जयवंत मरसाळे तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांच्यासह दिव्यांग बांधव बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात
रेणुका कोल्हे पुढे म्हणाल्या, जनतेसाठी अजून काय चांगले करता येईल ही भावना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मनाशी बाळगली आहे. जनतेच्या उत्कर्षासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांकडून त्यांनी सेवाभावाची शिकवण आत्मसात केली आहे. “सेवा हाच धर्म” हा आजोबांनी दिलेला मूलमंत्र अंगीकारून ते आज सर्व जनतेची सेवा करत आहेत. म्हणूनच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांचे विचार सातत्याने चालू असतात. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे अहोरात्र कार्यरत असतात. मनामध्ये चांगला भाव ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अपंगत्व असतानाही या बंधू-भगिनींनी स्वावलंबनाचा आदर्श ठेवावा, हे आपण कोल्हे साहेबांकडून शिकले पाहिजे. आजारपणात शारीरिक अडचणी असूनही त्यांनी स्वावलंबन स्वीकारले. स्वतःचे काम स्वतः करावे, कोणावरही अवलंबून राहू नये” असा त्यांचा विचार होता. त्याच विचारातून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.साधू वासवानी ग्रुपला १०० वर्षांची परंपरा असून ते सातत्याने दिव्यांग बंधू-भगिनींसाठी उपक्रम राबवत आहेत.कोपरगाव तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील दिव्यांगांना मदत मिळावी यासाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या पुढाकाराने कृत्रिम अवयव वाटपाचे काम सुरू आहे. त्यांच्या संघर्षाची, समाजाप्रती असलेल्या सेवाभावाची मी साक्षीदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बंधू-भगिनींना दर महिन्याला प्रमाणपत्रे मिळवून देण्याचे काम केले जाते. त्यासाठी त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था देखील करण्यात येते. तसेच इतर सरकारी योजना व लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आपण स्वावलंबी जीवन जगावे आणि ते अभिमानाने जगावे. देव एखादी गोष्ट हिरावून घेतो, पण त्याऐवजी काहीतरी अधिक देतो, हा सकारात्मक विचार मनात ठेवून जीवन जगावे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही, या भावनेने पुढे जावे.आज या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग बंधू आणि भगिनींना फक्त कृत्रिम अवयव देत नाही आहोत, तर यामध्यमातून एखाद्या परिवाराला आधार देत आहोत. कुणाच्या वडिलांना त्यांच्या पायावर उभे करत आहोत, तर एखाद्या परिवारातील आईची ताकद पुन्हा मिळवून देत आहोत. कुठल्याही परिवाराला चांगल्या पद्धतीचा आधार मिळावा, तो आधार आम्ही या माध्यमातून देत आहोत. म्हणूनच हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे.
१६ मार्चला सहकार महर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेबांची पुण्यतिथी,तर २४ मार्चला जयंती प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते. या दरम्यानचा सात दिवसांचा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. या काळात विविध उपक्रम राबवले जातात. स्वर्गीय कोल्हे साहेबांची विचारधारा, त्यांचा सेवाभाव आणि गोरगरिबांसाठी केलेले कार्य यांची आठवण ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा सेवा सप्ताह आयोजित केला जातो. त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करते रेणुकाताई कोल्हे यांनी केले.