आपला जिल्हा

कोपरगाव मतदारसंघात अवकाळी पावसाचा तडाखा; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा – मा. आ. स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव मतदारसंघात अवकाळी पावसाचा तडाखा; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा – मा. आ. स्नेहलताताई कोल्हे
” शासकीय आदेशाची वाट न पाहता स्थानिक परिस्थिती वरिष्ठ स्तरावर कळवा”
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३१ मार्च २०२६कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमध्ये सोमवार (दि.३०) मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीस आलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून,महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून समस्त शेतकरी बांधवांना शासकीय मदतीचा हात देण्यासाठी सहकार्य करावे, मात्र शासनाचे आदेश येण्याची वाट पाहण्याआधी अधिकाऱ्यांनी आजच स्थानिक परिस्थिती वरिष्ठ स्तरावर अवगत करावी अशी मागणी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

जाहिरात
मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, सध्या कोपरगाव तालुक्यासह पुणतांब्यासह परिसरातील चितळी,वाकडी व इतर गावांच्या विविध भागातील देखील शेतीचे नुकसान झाले आहे.यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, टरबूज, आंबा, द्राक्षे तसेच इतर फळबाग पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.याशिवाय पुढील काही दिवसही अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.या वादळ वाऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी जनावरांसाठी लागवड करण्यात आलेली मका व चारा पिके देखील पूर्णपणे नष्ट झालेले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील एरणीवर आलेला आहे. या प्रसंगामुळे संपूर्ण शेतकरी बांधव अतिशय हतबल झालेले असून त्यांना शासकीय मदत तात्काळ मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतामध्ये जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याकामी योग्य ते पाऊले उचलले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

जाहिरात
कोपरगाव मतदारसंघात वादळी वाऱ्यासह झालेल्या अचानक आलेल्या पावसामुळे काही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात बारदानाखाली साठवून ठेवलेला गहू व हरभरा अक्षरशः भिजल्याने शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट ओढवले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे