आपला जिल्हा
महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा – मा. आ. डॉ. सुधीर तांबे


Sangmner vijay kapse दि ११ एप्रिल २०२६– क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव, बंधुता,समता जोपासणारा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक मा आ डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे.







