संगमनेर मार्गे रेल्वेसाठी तालुक्यातील जनतेचा एल्गार

नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलल्याने संगमनेर सह नाशिक पुणे जिल्ह्यात संताप
रेल्वे मार्गासाठी आंदोलन भडकणार
संगमनेर प्रतिनिधी दि ५ डिसेंबर २०२५–लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे व्हावी या करता महारेल विभागाने सर्वेक्षण करून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसेही दिले. मात्र सत्ता बदलली आणि राजकीय स्वार्थासाठी रेल्वेचा मार्गही बदलला गेला पुण्यावरून पूलतांबा करणाऱ्या या रेल्वे मार्गाला संगमनेर,सिन्नर,जुन्नर, नारायणगाव येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाणार आहे. या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम व डिजिटल कॅम्पिंग सुरू झाली आहे.

संगमनेर तालुका वैभवशाली बनवताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या शेजारी काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी योगदान दिले. याचबरोबर तालुक्याच्या उत्तरेकडून समृद्धी महामार्ग जातो आहे. नव्याने सुरत – हैदराबाद महामार्गाचे भूसंपादन तालुक्यातून झाले आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून उजवा व डाव्या कालव्यातून तालुक्याला पाणी मिळत आहे. शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आहे. नाशिक पुणे महामार्गाची चौपदरीकरण झाले असून काँक्रीटचे काम पूर्णत्वास जात आहे. याचबरोबर विकासाला चालना देणारी नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मधून व्हावी याकरता सर्व काम अंतिम टप्प्यात आले होते.

मात्र महाविकास आघाडी सरकार बदलले आणि आता राज्यात आणि देशात महायुती आणि महाशक्तीचे सरकार असून स्थानिक लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांनी नाशिक पुणे रेल्वे चा मार्ग बदलवला आहे. सिन्नर – शिर्डी – अहिल्यानगर – पुणे असा पुण्यावरून पूलतांबा हा उलटा होणारा प्रवास. लागणारा जादा वेळ आणि गैरसोय यामुळे या रेल्वेचा कोणताही फायदा मूळ मार्गावर होणार नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये घोषणा करतात संपूर्ण संगमनेर विभागामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने संगमनेर करांची बैठक घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात जन आंदोलन उभारण्याची मोठी घोषणा केली. याबाबत त्यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार निलेश लंके,खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी तातडीने संपर्क साधला तर सिन्नरचे आमदार क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ, जुन्नरचे शरद सोनवणे,ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील,बाबाजी काळे यांच्याशी संपर्क साधून नाशिक – पुणे रेल्वे ही सिन्नर संगमनेर नारायणगाव खेड चाकण अशीच जावी याकरता तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. खरे तर विद्यमान सरकार व महायुतीतील लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाला विरोध करायला पाहिजे मात्र आता तसे न करता त्यांनी गुळगुळीत भूमिका घेतली आहे.
यावर संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडू असे गुळगुळीत उत्तर दिले कारण विद्यमान पालकमंत्री यांच्या निर्णयापुढे ते जाऊ शकत नाही. संगमनेर करांच्या लढ्यामध्ये सहभागी होणे त्यांना अवघड झाले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधातही संगमनेर तालुक्यातील तरुणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून संगमनेर तालुक्याची अस्मिता जपण्याकरता सर्वांनी राजकीय जोडी बाजूला ठेवून या जनआंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रेल्वे कृती समितीने केले आहे.
रेल्वे खेचून आणू – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
निळवंडे धरण व कालवे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. मात्र उद्घाटनाचे श्रेय घेण्याचा इतरांनी प्रयत्न केला. नाशिक – पुणे रेल्वे साठी त्यांनी पाठपुरावा केला मात्र सत्ता बदलताच ही रेल्वे शिर्डी मार्गे पळवली गेली. संगमनेर मधील सभेमध्ये आमदार सत्यजित तांबे म्हणाले की संगमनेरचे पाणी पळवण्याचा पूर्वेकडच्या नेत्यांचा डाव असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक पुणे रेल्वे करता पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांना न सांगता शेजारच्यांना सांगावे . याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले होते की रेल्वे सुद्धा खेचून आणू
संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम सुरू
नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी याकरता संगमनेर तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थी नागरिक महिला युवक यांच्यामध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली असून डिजिटल कॅम्पिंग सुद्धा सुरू झाली आहे. याचबरोबर ऑनलाइन पिटीशन सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये तरुणाईचा मोठा सहभाग राहणार असून सर्वांनी संगमनेर रेल्वे साठी एकत्र यावे अभि नही तो कभी नही असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
संगमनेर एमआयडीसीला मोठा फायदा
आमदार सत्यजीत तांबे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शासकीय एमआयडीसीची मागणी एप्रिल 2025 मध्ये साकुर बोटा परिसरामध्ये केली होती त्यानुसार त्या ठिकाणी सर्वेचे काम सुद्धा सुरू झाले आहे संगमनेर मध्ये सहकारी एमआयडीसी 100 एकरवर सुरू आहे त्यामध्ये 400 प्रोजेक्ट असून सुमारे दहा हजार कर्मचारी काम करत आहे. व्यापारी आणि औद्योगीकरणाच्या दृष्टीने संगमनेर वरून जाणारी रेल्वे ही विकासाला मोठी चालना देणारी ठरणार आहे.



