आपला जिल्हा

आमदार  कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश;भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत मक्याची थकीत रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

आमदार  कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश;भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत मक्याची थकीत रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

आमदार  कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश;भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत मक्याची थकीत रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २९ मे २०२६महाराष्ट्र शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या मक्याच्या थकीत रकमेबाबत आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रलंबित रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून या निर्णयाचे समस्त शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

जाहिरात

आ.विवेक कोल्हे यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मक्याच्या खरेदीची थकीत रक्कम वेळेत मिळण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

सन २०२५-२६ मध्ये राज्य सहकारी पणन महासंघामार्फत भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्यात आला होता. मात्र ८ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत खरेदी झालेल्या मक्याची देयके शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते व इतर शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता होती.

जाहिरात

या गंभीर बाबीची दखल घेत आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे तातडीने मागणी करून राज्यातील शेतकऱ्यांची थकीत रक्कम तत्काळ वर्ग करण्याची विनंती केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या गंभीर विषयाची दखल घेत राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

याबद्दल आ. विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री, पणनमंत्री तसेच शासनाचे आभार व्यक्त केले असून, पुढील काळातही राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे