संगमनेर

पिंपळगाव माथा येथील घर जळीत झालेल्या पांडे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाकडून मदत

पिंपळगाव माथा येथील घर जळीत झालेल्या पांडे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाकडून मदत
पिंपळगाव माथा येथील घर जळीत झालेल्या पांडे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाकडून मदत
जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि १० मार्च २०२५पिंपळगाव माथा येथील भारत रमाजी पांडे यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगे मुळे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.  या कुटुंबीयांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून गृह उपयोगी साहित्य व किराणा देऊन पांडे कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे.

जाहिरात
पिंपळगाव माथा येथे जळीत झालेल्या पांडे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा व गृह उपयोगी साहित्य देण्यात आले यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, डॉ नितीन भांड, रामदास तांबडे,जनसेवक बाळकृष्ण गांडाळ, तलाठी आर.डी पावसे ,ग्रामसेवक, उपसरपंच सुखदेव लहांगे ,पांडुरंग भागरे ,लक्ष्मण मांडे, सोपान पांडे ,अंकुश पांडे, बाळासाहेब क्षीरसागर, किसन पांडे ,दिनकर पांडे, संतोष क्षीरसागर,लक्ष्मण पांडे, सदाशिव पांडे, प्रदीप रोकडे आणि सह गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

भारत रमाजी पांडे यांच्या घराला लागलेल्या बागेतून घराचे पूर्ण नुकसान झाले याचबरोबर घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी घरामध्ये त्यांच्या पत्नी दोन मुले हे होते. प्रसंगावधान राखून सर्व घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टाळला. पांडे यांचा एक मुलगा दिव्यांग असून त्यालाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पांडे कुटुंबियांनी काही दिवसापूर्वी पेमगिरी येथील जिजाऊ महिला बिगर शेती पतसंस्थेकडून जमीन विकसित करण्यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते ते पैसेही यामध्ये जळून खाक झाले आहे याचबरोबर दागिन्यांसह मंगळसूत्रही जळाले आहे.

जाहिरात

अचानक लागलेल्या आगे मुळे या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावले आहे . या घटनेबाबत उपसरपंच व जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना याबाबत माहिती दिली. यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आपल्या यशोधन कार्यालयाच्या वतीने गृह उपयोगी साहित्य व किराणा साहित्य पाठवले.

जाहिरात

यावेळी बोलताना बाबा खरात म्हणाले की, तालुक्यातील गोरगरीब जनतेवर जेव्हा संकट येते तेव्हा कुटुंबप्रमुख म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात हे  कायम पाठीशी उभे राहिले आहे. हा तालुका त्यांनी परिवार मानला असून प्रत्येकाच्या सुखदुःखाचे सहभागी होत असतात. पांडे कुटुंबावर आलेला हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी असून शासकीय योजनांच्या माध्यमातून यशोधन कार्यालय व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पाठपुराव्यातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले. यावेळी पिंपळगाव माथा येथील ग्रामस्थ, भारत रमाजी पांडे व त्यांच्या कुटुंबीयांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व यशोधन कार्यालया प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे